Agri Technology: शेतीत क्रांती; ‘एसआरटी’ मुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न!पहा सविस्तर

Agri Technology: शेतीत क्रांती; 'एसआरटी' मुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न!पहा सविस्तर

Agri Technology: राज्यातील शेतकरी आजकाल शेतीच्या नव्या पद्धतीचा अवलंब करत आहेत, ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो व उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे. या पद्धतीचे नाव आहे सगुना रीजनरेटिव्ह टेक्निक (एसआरटी). ही एक अशी पद्धत आहे, जी शेतकऱ्यांना खर्च कमी व उत्पादनातं वाढ होते . चला,तर मंग जाणून घेऊया ही पद्धत नेमकी कशी फायदेशीर ठरते.

एसआरटी शेती पद्धत म्हणजे काय?

एसआरटी ही शेती पद्धत पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी आहे. यात शेतीची मशागत कमी करून जमिनीच्या नैसर्गिक सुपीकतेवर लक्ष केंद्रित केले जाते. सुरुवातीला शेतात चांगली मशागत केली जाते, ज्यात नांगरणी, वखरणी आणि रोटाव्हेटरचा वापर होतो. त्यानंतर शेतात ४ ते ५ फूट रुंदीचे बेड तयार केले जातात. या बेडवर ठिबक सिंचनाची व्यवस्था केली जाते, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो आणि पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळते.

विशेष म्हणजे, या पद्धतीत पिकांची काढणी केल्यानंतर शेतातील अवशेष (जसे की पाने, खोडे) तसेच ठेऊन त्याच बेडवर पुढील हंगामात मशागत न करताच टोकण यंत्राच्या सहाय्याने लागवड केली जाते. तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी आणि पिकांच्या संरक्षणासाठी स्प्रे पंपाचा वापर केला जातो. या पद्धतीत फक्त टोकण यंत्र आणि स्प्रे पंप ही दोनच यंत्रे प्रामुख्याने वापरली जातात, त्यामुळे यंत्रसामग्रीवरील खर्च कमी होतो.

२ कोटी ८१ लाख रुपयाचा ठेका असूनही चिखली शहरात दुर्गंधीच: चिखली शहरातील अस्वच्छतेवर काँग्रेस आक्रमक; नगर परिषदेला निवेदन

एसआरटी पद्धतीचे फायदे

फायदाविवरण
कमी उत्पादन खर्चनांगरणी, निंदणी यांसारख्या मशागतीच्या प्रक्रिया कमी झाल्याने खर्च कमी होतो.
मजुरांची बचतया पद्धतीमुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी होते, कारण मशागतीची कामे कमी असतात.
जमिनीची सुपीकताशेतातील पिकांचे अवशेष कुजून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे जमीन सुपीक होते.
जास्त उत्पादनसेंद्रिय कर्ब वाढल्याने पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, परिणामी उत्पादनात वाढ होते.
कमी फवारणी खर्चपिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, त्यामुळे फवारणीवरील खर्च वाचतो.

Maharashtra Weather: महाराष्ट्रात 25 ते 26 जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज: विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर हवामान खात्याचा इशारा

शेतकऱ्यांसाठी का आहे फायदेशीर?

एसआरटी पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे कारण ती कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देते. ही पद्धत पर्यावरणपूरक आहे, कारण ती जमिनीची सुपीकता टिकवून ठेवते आणि पाण्याचा अपव्यय कमी करते. शिवाय, मजुरांची टंचाई असलेल्या मराठवाड्यासारख्या भागात ही पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. सरकारदेखील अशा आधुनिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान आणि तांत्रिक सहाय्य मिळते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!